‘रिबेल्स अगेन्स्ट द राज’ : ज्या सात असामान्य विदेशी व्यक्तींनी भारत आणि भारतीयांच्या भवितव्याशी, जीवन संघर्षाशी स्वत:ला अखेरपर्यंत जोडून घेतलं, त्यांच्या विलक्षण कथा
जन्मानं आपला नाही, अशा देशाला ‘मायदेश’ म्हणून आपलासा करणं, अंत:प्रेरणेला प्रतिसाद देत एकट्यानं स्वदेश सोडणं, वसाहतवादी राजवटीच्या विरोधातील स्वातंत्र्य आणि नवनिर्माण, याकरता त्या देशातील नागरिकांनी छेडलेल्या लढ्यात सहभागी होऊन तुरुंगवास भोगणारे ही महान वीर. गुहा सार्थपणे त्यांना ‘कालातीत अशा नीतिकथा’ मानतात.......